October 2012 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

26 October 2012

तेरावा लक्ष्यसिध्दी सोहळा: ' दिवा महाराष्ट्राचा'

नमस्कार!!
मित्रांनो, मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की दिनांक ५ सप्टेंबर रोजी झालेल्या आमच्या 'विश्वास निर्मिती, वेगवान प्रगती', व १ ऑक्टोबर रोजी झालेल्या 'MAXIMUM ACHIEVEMENT' या आमच्या सेमिनारना नेहमी प्रमाणेच तुम्हा सर्वांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार.

लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाची तेरावी बॅच आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. ही बॅच अतिशय उत्साहात पार पडत आहे. आणि आता सर्व आजी-माजी प्रशिक्षणर्थ्यांना व तेराव्या बॅचच्या लक्ष्यवेधींना वेध लागले आहेत ते म्हणजे तेराव्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे!! लक्ष्यसिद्धी सोहळा म्हणजे लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाचा पदवीदान समारंभ! तेराव्या बॅचच्या सर्व लक्ष्यवेधींचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि मिळविलेल्या उत्तुंग यशासठी होणारा त्यांचा कौतुक समारंभ.

मित्रांनो, लक्ष्यवेधच्या या स्नेहमेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व त्यांचे मार्गदर्शन. या वेळेस आपल्याला लाभलेले मार्गदर्शक एक नसुन दोघे आहेत. विशेष म्हणजे ते Business Partners तर आहेतच, शिवाय Life Partners देखिल आहेत आणि खर्‍या अर्थाने एकमेकांना पुरक आहेत. त्यांची यशाची घोडदौड अतिशय वेगात सुरु आहे.

तेराव्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत, जगातलं पहिलं महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट, 'दिवा महाराष्ट्राचा' याचे संस्थापक व संचालक, डॉ. सुहास अवचट आणि सौ. दिपा अवचट.

त्यांच्या खास मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत की यशाचा हा डोलारा त्यांनी कसा काय रचला, उभारला व घडवला... Food Industry मधील त्यांच्या गेल्या २० वर्षांच्या प्रवासाबद्दल ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत. जागतीकरित्या पुरस्कृत आपल्या ३ रेस्टॉरंटच्या यशोगाथेबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत...

डॉ. सुहास अवचट (M.D.) यांच्या बद्दल थोडेसे:
  • Special Police Officer व Commanding Officer म्हणून 'Presidents Medal' विजेते.
  • 'Udyogshree' Businessman of the Year Award  विजेते.
  • Indo Swiss Society व IMC द्वारे 'The Best Restaurateur' म्हणून विजेते.
  • Police Public Liason Committee Greater Mumbai चे member
  • बर्‍याच वृत्तपत्र व मॅगझिन मध्ये त्यांनी लिहीले लेख छापुन आले आहेत व प्रसिद्ध झाले आहेत.
  • मराठी व हिंदी चित्रपट व टि.वी. मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे, शिवाय मॉडेलींग देखील केले आहे.

सौ. दिपा अवचट (C.E.O.) यांच्या बद्दल थोडेसे: 
  • टेबल-टेनिस मध्ये All India Civil Services, Revenue Department आणि राष्ट्रीय पातळीवर Gold Medal विजेत्या.
  • भारतीय पहिल्या डिझायनर रेस्टॉरंट पाककला-पुस्तक, 'The Goa Portuguesa Cookbook' व 'The Authentic Goa Cookbook' या पुस्तकांच्या लेखिका.
  • महाराष्ट्र कला निकेतन द्वारे 'महाराष्ट्र गौरव' पुरस्कार विजेत्या.
  • टॉप्स ग्रुपद्वारे Brand Building, Business Development साठी 'The Best C.E.O.' Award पुरस्कृत.
  • स्टार टि.वी. वर 'अली खान्स किचन' या पाककला स्पर्धेच्या विजेत्या.
  • त्यांनी स्वतः बरेच पाककला स्पर्धांमधे परीक्षकाची भुमिका देखिल बजावली आहे.
काही खास पुरस्कारः
  • 'Goa Portuguesa' या रेस्टॉरंटला H & FS या संस्थे तर्फे 'Best Indian Restaurant' 
  • पुरस्कार आणि International Tourism Council तर्फे 'Outstanding Gourmet Restaurant' हा पुरस्कार
  • 'दिवा महाराष्ट्राचा' या रेस्टॉरंटला Times Of India चा २००७ व २००८ मधे 'Best Restaurant' चा पुरस्कार व Miele Guide तर्फे २००९ मधे 'Asia's Finest Restaurant' पुरस्कार मिळाला.
  • 'Culture Curry' ला NHK Japan Broadcasting Corporation मार्फत 'Authentic Gourmet Restaurant' म्हणून पुरस्कृत.
अश्या जबरदस्त व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी व 'दिवा महाराष्ट्राचा' वर प्रकाश पाडणार्‍या त्यांच्या खास गप्पा ऐकण्यासाठी आपण आवर्जुन उपस्थित रहालच, त्या शिवाय आपल्या मित्र-परिवाराला देखिल या संधीचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित कराल यात काहीच शंका नाही, कारण या सोहळ्याचे आणखीन एक खास आकर्षण आहे... ते म्हणजे आपल्या सर्वांचा उदंड प्रतिसाद मिळालेल्या श्री. अतुल राजोळी यांच्या 'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तिचे प्रकाशन!!
 
तर मित्रांनो, भेटूया १ नोव्हेंबर रोजी.....

तेरावा लक्ष्यसिध्दी सोहळा:

विषय: 'दिवा महाराष्ट्राचा'
दिनांक: ०१ नोव्हेंबर २०१२


वेळः संध्याकाळी ठिक ६:० वाजता
स्थळः वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क जवळ, दादर (प.)
प्रवेश विनामुल्य

संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९


13 October 2012

वेळेचे व्यवस्थापन कसे कराल?

वेळेचे व्यवस्थापन कसे कराल?
गौरी खेर - सोमवार, २० ऑगस्ट २०१२
उद्याउमलणारी सर्व फुलं आजच्या बियांमधून जन्म घेतात..
 एक चिनी म्हण
आजच्या अत्यंत व्यग्र जीवनशैलीत वेळेचं व्यवस्थापन करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. वेळेच्या व्यवस्थापनामुळे कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करता येतो आणि त्यानुसार कामे उरकता येतात. अत्यंत घाईगर्दीच्या वेळेस अचानक उद्भवलेली महत्त्वपूर्ण कामे वेळेत पूर्ण करता येतात आणि परिस्थितीवर ताबा मिळवणे शक्य होते.
     उत्पादनक्षमता वाढवता येते.
    मनावरच्या ताणाची पातळी कमी करता येते.
    कार्यालयीन कामे आणि व्यक्तिगत आयुष्यात पार पाडायच्या गोष्टी यांचा समतोल साधता येणे शक्य होते.
वेळेचे व्यवस्थापन कसे करता येईल, हे पाहूयात:
१. योजना आणि आखणी-
विचार करण्यासाठी पुरेसा वेळ देऊन जर तुम्ही जी कामे उरकायची आहेत, ती योजनाबद्ध रीतीने पार पाडलीत, तर तुमच्या वेळेचा निश्चितच सदुपयोग होतो. विचार न करता आखलेला प्लान फिस्कटण्याची शक्यताच अधिक असते. कोणत्याही गोष्टीची आखणी करताना विविध शक्यता लक्षात घेऊन ती केली तर गोंधळ उडण्याची शक्यता कमी असते.  


२. उद्दिष्ट महत्त्वाचे-
तुमच्यासमोर नेहमीच एखादं उद्दिष्ट अथवा ध्येय असावं. त्यामुळे तुमच्या कामाला आणि ते साध्य करण्यासाठी तुम्ही जो वेळ देता त्याला एक दिशा प्राप्त होते. मात्र हे उद्दिष्ट सुरुवातीलाच निश्चित करावे. ते कसे, कधी आणि कितपत पूर्ण करता येईल, याचा आडाखाही आखलेला असावा. ते उद्दिष्ट तुम्हाला झेपेल, असे असावे.


३. अग्रक्रम ठरवणे-
जेव्हा ध्येय गाठण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता, त्यावेळी इटालियन अर्थतज्ज्ञ परेटो यांचा ८०-२०हा नियम वापरा. परेटो यांनी असं म्हटलंय की, ८० टक्के पुरस्कार तुम्हाला २० टक्के प्रयत्नांतून मिळू शकतात. हे अतिशय मौल्यवान २० टक्के प्रयत्न कोणते, ते समजून घेतल्यानंतर तुमचे अग्रक्रम तुम्ही ठरवू शकता. अशा तऱ्हेने तुम्हाला लाभदायक ठरतील अशा गोष्टींना आधी वेळ देणं, हे महत्त्वपूर्ण ठरतं.

४. कामांची यादी बनवणं-
दिवसभरात कोणकोणती कामं करायची, याची आखणी मनाशी करायला हवी. कामाची यादी आदल्या दिवशी झोपण्यापूर्वी किंवा सकाळी करता येईल. त्यामुळे कॅलेंडर किंवा कामाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेता येतं किंवा कामांची यादी करून आवश्यकतेनुसार त्यात बदलही करता येईल. या दोन्ही पद्धतींचा उपयोग गरज भासेल त्याप्रमाणेही करता येणं शक्य आहे. त्यामुळे कामाचं प्राधान्य लक्षात घेऊन एकापाठोपाठ एक काम उरकणं शक्य होतं.  


५. लवचिकता-
कामात अनेकदा अडथळे येण्याची, बिघाड होण्याची किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधलं जाण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टी गृहीत धरून कामाची आखणी करायला हवी आणि कामाची पद्धत ठरवायला हवी. वेळेचं नियोजन करणारी तज्ज्ञ मंडळी नेहमी असं सुचवतात की, प्रत्येकानं आपल्याजवळ असलेल्या वेळापकी ५० % वेळाचंच नियोजन करावं, तशा प्रकारेच कामाची आखणी करावी. फक्त निम्म्या वेळाचंच तुम्ही वेळापत्रक बनवल्यानं तुमच्या उरलेल्या निम्म्या वेळात तुम्हाला कामात येणारे अडथळे किंवा अचानक समोर आलेली आणीबाणीची परिस्थिती यांच्याशी सामना करता येतो. 

६. शारीरिक व मानसिक दृष्टीनं प्राइम टाइम लक्षात घ्या-
तुम्ही दिवसातल्या ज्या वेळात कामाच्या दृष्टीनं उत्साही, क्रियाशील असता, त्या वेळेत काम पूर्ण करणं उत्तम. तुम्ही पहाटेच्या वेळी काम करताना अधिक तरतरीत असता. रात्री काम करायला तुम्हाला अधिक आवडतं की, दुपारच्या वेळी तुम्हांला कामासाठी उत्साह अधिक असतो, हे जाणून घेऊन त्यावेळी काम केलं तर ते अधिक दर्जेदार आणि लवकर पूर्ण होतं. तुमच्यासाठी महत्त्वाची आणि प्रथम करायला हवीत अशी कामं करण्यासाठी वेळ देणं हा वेळेचं नियोजन करण्याचा सगळ्यात परिणामकारक मार्ग आहे.

७. योग्य गोष्टी योग्य तऱ्हेने करा-
सुप्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञ पीटर ड्रकर म्हणतात, ‘‘योग्य ती गोष्ट करणं हे गोष्टी योग्य रीतीनं करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. योग्य त्या गोष्टी केल्यानं अपेक्षित परिणाम साधला जातो. योग्य रीतीनं गोष्टी करणं म्हणजे तुमच्यातली कार्यक्षमतेनुसार कोणती गोष्ट योग्य आहे, यावर लक्ष केंद्रित करून नंतर ती योग्य रीतीने करण्यावर भर द्यायला हवा.’’


८. कामे तातडीने वा घाईत करू नका-
तातडीने केलेल्या कामाचे परिणाम अल्पकालीन असतात तर महत्त्वाच्या कामांमधून साध्य झालेले परिणाम दीर्घकालीन असतात. अशा महत्त्वपूर्ण कामाचा थेट संबंध तुमच्या अंतिम ध्येयाशी असतो. त्यामुळे तातडीने करावयाच्या कामांची संख्या कमीत कमी राखण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला तुमची महत्त्वाची आणि प्राधान्याने पूर्ण करावयाची कामं करायला पुरेसा वेळ मिळेल. 

९. अनावश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची कला शिका-
क्षुल्लक गोष्टींना टाळण्याची आणि ज्या कामांचा तुम्हाला भावी आयुष्यावर फारसा उपयोग होणार नाही, अशा गोष्टींपासून दूर राहायला शिका. कामांच्या यादीत महत्त्वाची कामं कोणती आणि बाजूला सारता येण्यासारखी कोणती, हे तुम्ही नक्कीच ठरवू शकता आणि शक्यतो जी कामं तुम्ही एकटय़ाने करू शकता, ती कामं करण्यावर अधिक भर देणं योग्य ठरतं.


१०. कामातली चालढकल टाळा-
अनेकदा पुढय़ातलं काम पुढे ढकलण्याची किंवा टाळण्याची वृत्ती बाळगलीत, तर तुमचं काम कंटाळवाणं होतं. अशा वेळी त्या कामाचे छोटे छोटे भाग करावेत आणि एक एक भाग पूर्ण करावा किंवा मग मोठं काम करताना कंटाळा टाळण्यासाठी त्या कामाला ठराविक वेळ द्यावा. कामाचा सगळा भार एकदम पेलण्यापेक्षा एका वेळी थोडं थोडं काम पूर्ण केलंत, तर तुम्ही अशा टप्यावर पोचाल, जिथे तुम्हालाच ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची निकड भासेल.

05 October 2012

गुरुकिल्ली सशक्त मनाची!


गुरुकिल्ली सशक्त मनाची!
 डॉ.अद्वैत पाध्ये   | (01/02/12) (Divya Marathi)
मनाचा शोध घेताना आपण पाहिले की, मन हे आपल्या मेंदूतच असते त्यातीलच काही भाग मन म्हणून कार्य करत असतो. हे कार्य जीवरासायनिक संप्रेरकांद्वारे चालत असते. मनाचे मुख्य कार्य म्हणजे विचार. भावना वर्तनाचे नियंत्रण. उत्तम इत्यादी. म्हणून पुढच्या काही मानसशास्त्रज्ञांनी याच गोष्टीवर अधिक संशोधन केले आणि त्यातूनच वैचारिक सिद्धांताचा जन्म झाला. म्हणजे आपल्याला जो काही त्रास होतो त्याला कारण आपली विचार करण्याची पद्धत असते असाविचारप्रधानसिद्धांत मानसशास्त्रज्ञांनी मांडला.

ॅरन बेक या मानसशास्त्रज्ञाने असे सांगितले की, आपल्याला जेव्हा नैराश्य येते तेव्हा आपण स्वत:बद्दल, स्वत:च्या भविष्याबद्दल आजूबाजूच्या वातावरणाबद्दल नकारात्मक विचार करू लागतो, परिणामी आपले नैराश्य वाढते. परंतु, या संदर्भात सर्वात मोठे कार्य अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञाने केले आहे. स्वत:च्या आयुष्यात लहानपणापासून आलेले विविध अनुभव, त्यांच्याशी त्याने केलेला सामना यावरून या सिद्धांताचा जन्म झाला. त्यावरूनच पुढे सद्सद्विवेकवर्तन उपचार पद्धतीचा (Rational Motive Behaviour Therapy) जन्म झाला.

हा सिद्धांत म्हणजे एक समीकरण आहे.
+ =
यात  म्हणजे Antecedent Event घडलेली घटना
म्हणजे Belief System किंवा विचारसरणी किंवा घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन.
म्हणजे Consequences किंवा परिणाम म्हणजे चिंता, नैराश्य, राग, क्रोध वगैरे विरूप भावना.
एलिसने असा सिद्धांत मांडला की, आपल्यावर जो काही परिणाम होतो तो झाला की आपल्याला किंवा इतरांना वाटते की तो घडलेल्या घटनेचा परिणाम आहे; परंतु एलिसच्या सिद्धांताप्रमाणे आपण बघत/भोगत असलेला परिणाम हा त्या घटनेचा प्रत्यक्ष परिणाम नसतो, तर त्या घटनेकडे बघण्याची आपली विचारसरणी ठरवते की त्या घटनेचा आपल्यावर कोणता परिणाम होणार.

उदा. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला आणि त्याच्या मनात नैराश्य आले, आत्महत्येचे विचार येऊ लागले. या उदाहरणात परीक्षेतील अपयश ही घटना किंवा आहे, तर नैराश्य हा किंवा परिणाम आहे. मग त्याचा काय असेल? कारण परीक्षेत नापास अनेक विद्यार्थी होतात; परंतु सर्वच काही निराश होत नाहीत. म्हणजेच त्यांची विचारसरणी वेगळी निराशा आलेल्याची वेगळी हे तर नक्की!

म्हणजे हा विद्यार्थी असा विचार करत होता की, मला कधीच परीक्षेत अपयश येताच कामा नये. आल्यास त्यासारखी महाभयंकर गोष्ट नाही. त्यामुळेच अपयश आल्यावर त्या महाभयंकर गोष्टीचा सामना करण्याऐवजी निराश होऊन आत्महत्येचे पलायनवादी विचार/अविवेक निर्माण झाले. त्यातूनच हा परिणाम दिसला.


थोडक्यात त्याच्या अविवेकी (irrational) विचारांमुळे त्याच्या मनाचा दृष्टिकोन (नापास होण्याच्या घटनेकडे बघण्याचा) अविवेकी राहिला, त्यामुळे त्याच्या मनात निराशेच्या विरूप भावना निर्माण होणे हा परिणाम दिसला. मग विवेक विचार कोणता असायला पाहिजे? मी परीक्षेत यश मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. प्रयत्न करणे माझ्या हातात आहे. ते मी व्यवस्थित करीन; परंतु काही कारणामुळे यश पुढे-मागे कमी-जास्त होऊ शकते. हा झाला विवेकी विचार. असा विचार करणारा विद्यार्थी परीक्षेत नापास झाल्यावर दु:खी जरूर होईल; पण पाच-सहा दिवसांनी नक्की स्वत:ला सावरेल पुढचा विचार करू लागेल! म्हणजेच त्याच्या मनात नकारात्मक पण अनुरूप भावना निर्माण होईल जी त्याची प्रगती रोखणार नाही हे नक्कीअनेक सेशन्समधून वर्तनोपचाराच्या साहाय्याने (Behavior Modification) ते साध्य होऊ शकते. या सर्व गोष्टी संबंधित व्यक्तीचे (Client) सहकार्य असल्याशिवाय शक्य नाही. कारण हा सर्व प्रवास दोन्ही चाके एकत्र फिरल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.सध्याच्या ताणतणावपूर्ण जीवनात जास्तीत जास्त आनंदी, आरोग्यपूर्ण राहण्यासाठी, मनाची चांगली मशागत करणारी ही गुरुकिल्ली आहे. समर्थ रामदासांनी दासबोधात म्हटलेच आहे.
धकाधकीचा मामला। कैसा घडे अशक्ताला।
नाना युक्ती शक्ताला। म्हणोनि सिकवाव्या।।
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites